अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियम २०२६ मध्ये केली सुधारणा

अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियम २०२६ मध्ये केली सुधारणा

 

 

रिपोर्टर एस. के. शब्बीर यवतमाळ

 

महाराष्ट्रात १ जानेवारीपासून अंमलबजावणी सुरु झाली त्यानुसार आता एका वर्षात एकाच वाहनावर वाहतूक नियम मोडल्याची पाचवेळा कारवाई झाल्यास त्यावर कठोर कारवाई होणार आहे. अशा वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र, बॅंकेतून लोन, परमीट, एनओसी मिळणार नाही. त्याचे वाहनाचे नूतनीकरण व हस्तांतरण देखील करता येणार नाही.

वाहतूक नियम मोडलेल्या वाहनधारकासह तीन दिवसांत इलेक्ट्रिक माध्यमाद्वारे तीन दिवसांत ई-चालान पोच होईल

वाहनचालकाने पाचवेळा नियम मोडल्यास तो चालक वाहतुकीतील सराईत गुन्हेगार मानला जाणार आहे. नव्या नियमावलीनुसार त्या चालकावर कडक कारवाई होऊ शकते. दुसरीकडे ‘चालान’वरील आक्षेप संबंधित वाहतूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्यावर त्या वाहनधारकास न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. पण, त्यासाठी त्याला दंडाची ५० टक्के रक्कम आधी भरावी लागणार आहे.

‘चालान’वर आक्षेपासाठी ४५ दिवस

आरटीओ, वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिसांकडून बेशिस्त वाहनांवर ‘चालान’द्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. अनेकदा एखाद्याची गाडी त्याठिकाणी नसताना त्यांना दंडाचे चालान जाते. काहीवेळा वाहतूक नियम मोडला नसताना देखील दंड होतो. अशा वाहनचालकांना पुराव्यासहित ४५ दिवसांत ऑनलाइन किंवा संबंधित यंत्रणेच्या कार्यालयात जाऊन हरकत नोंदवावी लागेल. मुदतीत हरकत न नोंदविल्यास तो दंड त्या वाहनधारकास भरावाच लागेल, असेही नियमावलीत नमूद आहे.

प्रत्येकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे

नवीन केंद्रीय मोटार वाहन नियम-२०२६ नुसार आता एकाच वाहनावर वर्षभरात पाचवेळा दंडात्मक कारवाई झाली असेल तर त्या वाहन चालकाचा परवाना रद्द होऊ शकतो. याशिवाय दंडाची रक्कम भरल्याशिवाय त्या वाहनाची विक्री, नूतनीकरण, हस्तांतरण, फिटनेस अशी कोणतीही कार्यवाही करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकांनी वाहतूक नियमांचे पालन करा

वाहनचालकांसाठी मोठी बातमी! 1 वर्षात पाचवेळा वाहतूक नियम मोडला तर आता वाहन थेट ‘ब्लॅकलिस्ट’; वाहन परवानाही होणार निलंबित; केंद्राचे नवे राजपत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *