आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जिल्हा कारागृह येथे आदरांजली वाहण्यात आली
- CT INDIA NEWS

- Aug 11, 2020
- 1 min read

प्रतिनिधी- स्वाती व्हटकर -सांगली
९ ऑगस्ट क्रांती दिन*
९ ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली.या आंदोलनात भाग घेतलेल्या नागरिकांना इंग्रजांनी तुरुंगात टाकले.अनन्वित अत्याचार केले.त्यात अनेकजण मृत्युमुखी पडले. या सर्व ज्ञातअज्ञात हुतात्म्यांचे स्मारक प्रत्येक कारागृहाबाहेर उभारण्यात आले आहे.
या हुतात्म्यांच्या त्यागामुळेच आपण आज स्वातंत्र्यात सुखाने जगत आहोत.....
आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जिल्हा कारागृह, सांगली समोरील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकास तेथील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे समवेत जयहिंद व्यायाम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुष्पहार, फुलं अर्पण करून आदरांजली वाहिली.
सांगली रिपोर्टर सौ स्वाती व्हटकर







Comments