कृषिपंपाचा विद्युतपुरवठा खंडित करणे थांबवा . शेतकऱ्यांनी रोखली नारा टी -पॉईंट नागपूर अमरावती महामार
- CT India News
- Mar 1, 2022
- 1 min read
कृषिपंपाचा विद्युतपुरवठा खंडित करणे थांबवा .
शेतकऱ्यांनी रोखली नारा टी -पॉईंट नागपूर अमरावती महामार्गावरील वाहतूक .
कारंजा( घा )/प्रतिनिधी -पियुष रेवतकर
कारंजा (घा ):महावितरणकडून थकबाकीचे कारण पुढे करून कृषी पंपाचा वारंवार विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे .महावितरण ने ही कार्यवाही थांबवित शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना 24 तास विद्युत पुरवठा द्यावा ,या मुख्य मागणी साठी शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत नागपूर अमरावती महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले ,या आंदोलनाचे नेतृत्व संदीप भिसे यांनी केले.महावितरणच्या धडक विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेमुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे .कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर विहरित पाणी असतानाही सिंचनाअभावी उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे .त्यामुळेच महावितरणने ही मोहीम तातडीने थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना 24 तास विद्युत पुरवठा द्यावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली .नारा टी पॉईंट करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नागपूर अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळकरिता खोळंबली होती .आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक योगेंद्र यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आंदोलन स्थळ गाठून महावितरण अधिकारी राजूरकर यांच्याशी चर्चा घडवून दिली.महावितरण अधिकाऱ्यांकडून दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले .











Comments