*रेल्वेच्या उशीरा धावण्याबद्दल अखेर रेल्वे प्रवाशी प्रा.डाॅ.डि..एम.ललवाणी न्याय* प्रतिनिधी सचिन चौध
- CT India News
- Feb 26, 2022
- 2 min read
*रेल्वेच्या उशीरा धावण्याबद्दल अखेर रेल्वे प्रवाशी प्रा.डाॅ.डि..एम.ललवाणी न्याय*
प्रतिनिधी सचिन चौधरी (महा ब्युरो चीफ) सिटी इंडिया न्युज
भुसावळ - येथील श्रीमती प. क. कोटेचा महीला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. दिलीपकुमार मदनलाल ललवाणी यांना रेल्वेने त्रासापोटी रु.25,000 व तक्रार खर्चापोटी रु.3000 देण्याचे जिल्हा ग्राहक मंचाचे आदेश.
या बाबत सविस्तर व्रुत्त असे की, प्रा.डाॅ.डि.एम.ललवाणी यांनी दिनांक 22- 5- 2018 रोजी गुवाहाटी(आसाम) येथून भुसावळ येण्यासाठी गाडी.क्र.15648 या रेल्वेचे आरक्षण केले होते. ही गाडी दुपारी तीन वाजता गोवाहाटी रेल्वे स्टेशनवरुन निघणे निश्चित होते. त्यामुळे ते आपल्या कुटुंबासह रेल्वे स्टेशनवर आले. तीन वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची त्यांना भ्रमणध्वनीवर वा कोणतीही सूचना न मिळाल्यामुळे त्यांनी रेल्वे विभागात लेखी तक्रार केली. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की गाडी साडेसहा तास उशिराने निघेल. नंतर सुद्धा मात्र गाडी प्लॅटफॉर्मवर न आल्यामुळे त्यांच्या समवेतचे सहप्रवासी नितीन छेडा हे तक्रार करायला गेले असता त्यांनी गाडी पुन्हा तीन तास उशिरा होईल असे नमूद केले. त्यामुळे तीन वाजता सुटणारी गाडी ही रात्री जवळपास पावणे बारा वाजता गुवाहाटी स्थानकावरुन रवाना झाली.
यामुळे त्यांना व त्यांच्या परिवाराला व सोबत असलेल्या सर्व सहप्रवाशांना मानसिक आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला .भुसावळ येथे परतल्यानंतर त्यांनी रीतसर पुन्हा लेखी तक्रार केली. त्याला उत्तर न आल्यामुळे त्यांनी वकिलामार्फत गुवाहाटी रेल्वेला नोटीस पाठवली. ती रजिस्टर पोस्टाने पाठवली मात्र रेल्वेने त्याचीसुद्धा दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने न्याय मिळावा या हेतूने त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगाव यांचे समोर दिनांक 8/4/2019 रोजी ग्राहक तक्रार क्रमांक .139/ 2019 नुसार तक्रार दाखल केली . उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकून ग्राहक आयोग यांनी तक्रारकर्ता प्रा.ललवाणी यांचे म्हणणे अंशताहा: मान्य करून प्रा. दिलीपकुमार ललवाणी यांना झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल रुपये पंचवीस हजार व तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रुपये 3000 अदा करावेत असा आदेश ग्राहक ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्षा श्रीमती पुनम मलिक व सदस्य श्री सुरेश जाधव यांनी दिले .हा आदेश म्हणजे रेल्वे प्रवाशांना दिलेला योग्य न्याय असुन रेल्वेला सुचक इशारा आहे.याकामी भुसावळ येथील अँड.धिरेंद्र आर. पाल यांनी तक्रारदाराला तर्फे प्रभावी बाजु मांडली. या निर्णयाने रेल्वे प्रवासाबद्यल योग्य न्याय मिळाल्याची भावना सर्व स्तरावरुन व्यक्त करण्यात येत आहे.









Comments